Divyamarathi provides the all Akola News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
प्रतिनिधी । नागपूर
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेअंतर्गत घेण्यात
आलेल्या चतुर्थ श्रेणी पदभरतीमध्ये
मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला
असून, मर्जीतील उमेदवारांना
लाभ पोहोचवण्यासाठी प्रारूप
उत्तरपत्रिकाच (मॉडेल अॅन्सरपेपर)
चुकीची तयार करण्यात आली, असे
आरोप करणारी याचिका मुंबई उच्च
न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात
गुरुवारी दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेवरील प्रारंभिक
सुनावणीनंतर न्या. भूषण गवई आणि
न्या. मृदुला भटकर यांच्या खंडपीठाने
रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक
(पीजी),बिलासपूर येथीलदपूमरेल्वे
मुख्यालयाचे महाव्यवस्थापक आणि
रेल्वेभरती मंडळाचे अध्यक्षांना नोटीस
बजावली असून, तीन आठवड्यांत
उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले
आहे. दपूम रेल्वेने चतुर्थ श्रेणी
वर्गातील २ हजार ७९ पदांसाठी २८
ऑगस्ट २०१२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध
केली. या जाहिरातीनुसार गोंदिया
जिल्ह्यातील सालेकसा रहिवासी
ईश्वरप्रसाद उर्वरित पान. १२
द-पू-मध्य रेल्वेच्या
पदभरतीत घोटाळाउच्च न्यायालयाची रेल्वे मंत्रालयाला नोटीस
प्रारूप उत्तरपत्रिकेतच
आढळून आल्या ६७ चुका
परिसर पक्षी प्रगणनेत सहभागी पक्षीनिरिक्षक, निसर्गप्रेमींची चमू.
विलास देशमुख । अकोला
निसर्ग संवर्धन चळवळ अधिक व्यापक
करावयाची असेल तर सर्वसामान्यांचा
सहभाग वाढवणे गरजेचे आहे. बदलत्या
जीवनशैलीमुळे माणूस निसर्गापासून
दुरावतो आहे. त्यासाठी ‘ग्रेट बॅकयार्ड
बर्ड काउंट (जीबीबीसी)’ म्हणजेच
आपल्या अंगणातील पक्ष्यांची गणना हा
उपक्रम राबवण्यात येत अाहे. यंदा १३ ते १६
फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या पक्षी प्रगणनेला
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचा
पाठिंबा असून, त्यांनी सर्वसामान्यांचाही
सहभाग वाढवण्यावर भर दिला आहे.
भारतीय निसर्गप्रेमी २०१३ पासून या
पक्षी प्रगणनेत सहभागी होतात. हा चार
दिवसीय उपक्रम सर्वांसाठी खुला असून,
भारतभरातील शेकडो पक्षी निरीक्षक
यामध्ये सहभागी होऊन पक्ष्यांची माहिती,
नोंद ऑनलाइन करतात. जगभरात एक
लाखांवर पक्षी निरीक्षक यामध्ये सहभागी
होतात. मागील वर्षी देशात एक हजार
पक्षी निरीक्षकांनी ८०० पक्षी प्रजातींची नोंद
केली होती, ही इतर कुठल्याही देशापेक्षा
मोठी होती. यामध्ये चिमणी, कावळा,
कबुतर यांची सर्वाधिक नोंद होती. मात्र,
त्यासोबतच दुर्मिळ पक्षी प्रजाती जसे ब्ल्यू
नॅपड पिट्टा (नवरंग) याचीही नोंद झाली.
या उपक्रमामुळे भारतातील पक्ष्यांची
योग्य पद्धतीने नोंद करणे शक्य होऊन
त्यांच्या संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या
उपक्रमांचे नियोजन करणे शक्य होते.
चला, आपल्या अंगणातील पक्ष्यांची नोंद घेऊ या !
उपक्रमात असे व्हा सहभागी
आपल्या प्रांगण, परिसरातील पक्ष्यांच्या
प्रगणनेच्या उपक्रमात एकाच भागात १५
मिनिटांपेक्षा जास्त काळ दिसणाऱ्या प्रत्येक
पक्ष्याची नोंद घेण्यात येईल. तसेच ही नोंद
आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘www.ebird.org’
या वेबसाइटवर टाकता येईल. उपक्रमात
सहभागी होणारी व्यक्ती कितीही पक्ष्यांच्या
यादी अपलोड करू शकते. चार दिवसांमध्ये
वेगवेगळ्या ठिकाणच्या यादी टाकता येतील.
अधिक माहितीसाठी ‘www.birdcount.
in’ या वेबसाइटवर क्लिक करता येईल,
अशी माहिती बीएनएचएस संस्थेचे समन्वयक
व्यवस्थापक अतुल साठे यांनी दिली आहे.
दिव्यमराठीविशेष बीएनएचएसमार्फत होणार चार दिवस पक्षी गणना; पक्षी निरीक्षक, विद्यार्थी, नागरिकांना सहभागी होण्याची आहे नामी संधी
अकोला शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०१५
एकूण पाने १२+४+८=२४। किंमत ~३.०० *
सेन्सेक्स 28805.10
मागील 28533.97
सोने 27,800.00
मागील 27,850.00
चांदी 39,500.00
मागील 39,500.00
डॉलर 62.31
मागील 62.25
यूरो 70.63
मागील 70.31
सुविचार
यशाची पायरी मला माहीत
नाही; पण प्रत्येकालाच
सुखावण्याचा प्रयत्न करणे हा
नक्कीच अपयशाचा मार्ग आहे.
बिल कोरबी
न्यूजइनबॉक्स
गुडन्यूज
१२५ टोल नाक्यांवर टोल
भरण्याची गरज नाही
नवी दिल्ली | फेब्रुवारीच्या
अखेरपासून देशातील १२५ टोल
नाक्यांवर टोल भरण्याची गरज
राहणार नाही. हे टोल नाके बंद
करण्याचा निर्णय केंद्र सरकारने
घेतला आहे. केंद्रीय रस्ते परिवहन
मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी
याबाबत माहिती दिली.
सविस्तर. पान ११
आयआरसीटीसीची वेबसाइट
ठप्प, युजर्स वैतागले
नवी दिल्ली | रेल्वेची ऑनलाइन
बुकिंग साइट आयआरसीटीसी
तब्बल ४५ मिनिटे बंदी पडली.
यामुळेलाखोयुजर्सनाअडचणीचा
सामना करावा लागला. तथापि,
साइट डाऊन होण्यामागील कारण
स्पष्ट करण्यात आलेले नाही.
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष २ | अंक २०८ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन
आकृतिबंधावर तोडग्यासाठी समिती
िशक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या
नोकऱ्या बचावल्या
मुंबई । प्रतिनिधी
राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अंशत: अनुदानित
माध्यमिक, उच्च माध्यमिक व सैनिकी शाळांना
लागू करण्यात आलेल्या सुधारित आकृतिबंधाचा
फेरविचार करण्यासाठी शासनाने आज शिक्षण
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.
या िनर्णयाने राज्यातील हजारो िशक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या
नोकरीवर आलेले गंडांतर दूर झाले असून, शैक्षणिक
संस्थाचालकांनाही िदलासा िमळाला आहे.
राज्यात एक लाख प्राथमिक, माध्यमिक व उच्च
माध्यमिक शाळांपैकी २०,४५५ अनुदानित खासगी शाळा
आहेत. आॅक्टोबर २०१३ मध्ये शालेय िशक्षण िवभागाने
िकती िवद्यार्थ्यांमागे िशक्षकेतर कर्मचाऱ्यांचे किती प्रमाण
असावे, याबाबत नवे निकष (सुधारित आकृतिबंध)
लागू केले होते. नव्या आकृतिबंधामुळे हजारो
िशक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले होते. शासनाच्या
या िनर्णयाविरोधात िशक्षक - शिक्षकेतर संघटना आणि
संस्थाचालकांनी आंदोलन छेडले होते. त्यामुळे नव्या
फडणवीस सरकारने उर्वरित पान. १२
जमिनीचे अधिकार कशाला हवेत ? : एकनाथ खडसे
विशेष प्रतिनिधी | मुंबई
दिल्ली विधानसभेचे निकाल येताच
भाजपने शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना
अधिकार दिले
नसल्याचे सांगून
राजीनाम्याची धमकी
देणाऱ्या शिवसेनेच्या
नेत्यांना भाजपनेही
सडेतोड उत्तर दिले
आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड
यांना अधिकार दिले असले तरी त्यांना
इनामी जमिनीविषयक अर्धन्यायिक
अधिकार हवे आहेत, असा टोला
महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी लगावत
राठोड यांच्यावरच संशयाची सुई
रोखण्याचा उर्वरित पान. १२
भाजपचा पलटवार; सेनेचा पुन्हा वार!
अधिकार खडसेंकडेच का?
दोन महिन्यांपासून मी एकाही फाइलवर सही
केली नसून जमिनीची प्रकरणे माझ्याकडे
न देता खडसे यांनी
स्वतःकडे का ठेवली
समजत नाही. राज्य
स्थापन झाल्यापासून
राज्यमंत्र्यांकडे त्याचे
अधिकार अाहेत आणि
मी माझे अधिकारच मागत अाहे,’ असे सांगत
राज्यमंत्री संजय राठोड यांनी खडसे यांच्या
आरोपांचे खंडन केले. ‘मुख्यमंत्र्यांनीही
माझ्याकडे काम सोपवण्यास खडसे यांनी
सांिगतले, परंतु त्यांनी ऐकले नाही. मी नवीन
आहे. मला संधी दिली पाहिजे. सुरुवातीलाच
मी काही वेडेवाकडे काम करेन का?’
भाजप मंत्र्यांनी परस्पर
नियुक्त्या करू नयेत
विशेष प्रतिनिधी | मुंबई
भाजप व िशवसेनेमधील मंत्र्यांमध्ये
अधिकारावरून िनर्माण झालेला वाद
चव्हाट्यावर आला असताना आता
भाजपअंतर्गत अाधीच असलेला फडणवीस-
खडसे यांच्यातील वाद नव्याने उफाळून
आला आहे. त्याला निमित्त ठरले ते
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्ररूपाने
या वादात घेतलेल्या उडीचे. ‘भाजपच्या
मंत्र्यांनी महामंडळ तसेच समित्यांवर परस्पर
िनयुक्त्या करू नयेत. त्याची यादी आधी प्रदेश
कार्यालयाला कळवायला हवी,’ अशी तंबीच
दानवे यांनी या पत्रात उर्वरित पान. १२
माणसाळलेल्या वाघांची शाळा..डरकाळीही प्रेमळ
बँकॉक | एरवी वाघ पाहिल्याबरोबर छातीत धडधडायला लागते, परंतु थायलंडच्या
कांचानाबुरी प्रांतात दिसणारे हे वाघ (बंगाल टायगर) माणसांसोबत मुक्त विहार
करतात. एका विहार परिसरात त्यांचे संगोपन केले जाते. बौद्ध भिक्खू त्यांच्या सोबत
सहजपणे असा संवाद साधतात. वाघांची ही वस्ती टायगर टेम्पल म्हणून आेळखली
जाते. येथे १०० हून अधिक वाघांची येथे वस्ती आहे.
स्वाइन फ्लू घेतोय उग्ररूप,
देशात ४०७ जणांचा बळीदिव्य मराठी नेटवर्क । जयपूर/अहमदाबाद
देशभरात स्वाइन फ्लूचा वेगाने फैलाव होत
असून या आजाराने आतार्यंत विविध राज्यांत
सुमारे ४०७ बळी घेतले आहे. राजस्थानात या
आजाराने थैमान घातले असून त्या खालोखाल
महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातही या
आजाराची दहशत पसरली आहे. फेब्रुवारीमध्ये
गेल्या अकरा दिवसांत या आजाराने २१६ जणांचे
बळी गेले असून आतापर्यंत ५१५७ लोकांचे स्वाइन
फ्ल्यूचे नमुने पाॅजिटीव्ह आले आहेत. गुरुवारी
मध्यप्रदेशात एकाच दिवशी सात जणांचे तर
हैदराबादमध्ये सहा बळी गेले आहेत.
स्वाइन फ्ल्यूने राजस्थानातही थैमान घातले
आहे. बुधवारी जयपूरमध्ये एकाच दिवशी ५
जणांचा मृत्यू झाला आतापर्यंत ११६ जणांचे
बळी गेले आहेत. खळबळ उडाली आहे.
गुजरातमध्येही या आजाराने १०८ लोकांचा मृत्यू
झाला आहे. तर रुग्णांची संख्या १०७५ पर्यंत गेली
आहे. पैकी ६०१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू
असून इतरांना उपचारानंतर िडस्चार्ज देण्यात
आला आहे. गुजरातमध्ये आरोग्य यंत्रणेने
घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती
घेतली आहे. त्यात २६ हजार लाेकांवर तत्काळ
उपचार करण्यात आले.
महाराष्ट्रातही दहशत
मुंबई | गुरुवारी स्वाइन फ्लूमुळे मुंबईत तिघांचा
मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल
१६ जणांना स्वाइन
फ्लूची लागण झाल्याचे
समोर आले आहे. यामध्ये
३ आणि १० महिन्यांच्या
बाळांचाही समावेश आहे.
राज्यात नागपुरात सर्वाधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण
आढळले असून त्यापोठापाठ पुण्याचा नंबर लागतो.
नाशकात तीन महिलांचा मृत्यू. पान ४
{नोकर आणि सहायकांनी
दिलेल्या उत्तरांवरही केली
एसआयटीने उलट तपासणी
सुनंदाप्रकरणी शशी थरुरांची
रात्री उशिरापर्यंत झाडाझडती
दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली
पत्नी सुनंदा पुष्कर हत्याकांडात काँग्रेस
खासदार शशी थरूर अडकण्याची चिन्हे
आहेत. एसआयटीने गुरुवारी दोन वेळा
त्यांची चौकशी केली. आधी सकाळी
११.३० वाजता बलावले. तेव्हा पोलिसांनी
त्यांना पाच तास प्रश्न विचारले.
थरूर यांच्याबरोबरच आणखी पाच
लोकांनाही एसआयटीने बोलावले होते.
थरूर यांचा नोकर बजरंगी व नारायण
सिंह, मित्र संजय दिवाण, स्वीय सहायक
प्रवीण कुमार व ह्रदयरोगतज्ज्ञ रजत मोहन
यांना समोरासमोर बसवून चौकशी झाली.
त्यानंतर थरूर यांना सोडून देण्यात आले.
मात्र या पाच जणांची चौकशी सुरूच होती.
त्यात अनेक नवीन तथ्यांवर प्रकाश पडला.
थरूर आजवर दडवू पाहत असलेल्या
गोष्टीही उजेडात आल्या. त्यातच रात्री
साडे दहा वाजता उर्वरित पान. १२
पाच लोकांसमोर बसवून दिवसा विचारले ५० हून जास्त प्रश्न
रात्री उशिरा विचारले : दिशाभूल का करत आहात?
{थरूर शुक्रवारी त्रिवेंद्रमला
जात असल्यामुळे गुरुवारी
रात्रीच त्यांना बोलावले होते.
{सुनंदा व थरूर भांडत होते.
अनेकदा मॅडम साहेबांची
कॉलरही धरत होत्या, असे
नोकरांनी सांगितले.
{थरूरांना विचारले सुनंदांच्या
जीवनातील शेवटच्या पाच
तासाबाबतच बहुतांश प्रश्न.
{आयपीएलबाबत आईला
काही तरी सांगायचे होते, पण
तसे झाले नाही, असे सुनंदांचा
मुलगा शिव म्हणाला.म्हणून
थरूरांना प्रश्न विचारले गेले.
{ दिवसा संजय दिवाणांनी
सांगितलेल्या गोष्टींवर
थरुरांना स्पष्टीकरण विचारले
व आणखी काही असेल तर
आताच सांगा, असेही विचारले.
पोलिस ठाणे असेच असते : शशी थरूर गुरुवारी वसंत विहार
पोलिस ठाण्यात पोहोचले. ही त्यांची तिसरी वेळ आहे.
गुजरातेत मोदी
मंदिर पाडले
राजकोट |
येथे ओम युवा
ग्रुप'कडून उभारण्यात आलेल्या
मोदी मंदिरा'वर पंतप्रधान नरेंद्र
मोदींनी नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर ग्रुपच्याच कार्यकर्त्यांनी हे
मंदिर पाडले आहे. ३०० लोकांनी
७ लाख रुपये खर्चून मंदिर बांधले
होते. मोदींच्या मूर्तीवर दोन लाख
खर्च झाला होता.
तुरुंग नियमांना संजयचा
फाटा; चाैकशीत ठपका
मुंबई | संजय दत्त फर्लोची
मुदत संपल्यानंतरही दोन दिवस
तुरुंगाबाहेर राहिल्याने त्याच्या
अडचणी वाढल्या आहेत.
डिसेंबरमध्ये संजय १४ दिवसांच्या
फर्लोवर घरी परतला होता.
फर्लोला मुदतवाढ मागितल्याचे
निमित्त करून दोन दिवसांनी
तुरुंगात पोहोचला होता. याप्रकरणी
अतिरिक्त पोलिस महासंचालक
(तुरुंग) मीरा बोरवणकर यांनी
चौकशी अहवाल सादर केला.
#AskTheCaptain ट्विटद्वारे तुम्हीही
सामन्यानंतर विचारू शकता कॅप्टनला प्रश्न.
दररोज एका प्रश्नाचे ट्विट निवडले जाईल.
#PlayofTheDay द्वारे ट्विट करून
व्होटिंग कार्डावर क्लिक करून दिवसातील
सर्वोत्तम झेल, विकेट व शॉट निवडता येईल.
भारतीयांसाठी खास सुविधा. 011 - 30496049
वर मिस कॉल देऊन दररोज आयसीसीचे तीन
ट्विट मोफत मिळवता येतील.
ट्विटरवर या
कपचे संपूर्ण वर्ल्ड
उद्यापासून लढती, भारत-पाक
यांचा पहिला सामना रविवारी
४४ दिवस अाता फक्त
क्रिकेट अन् क्रिकेटच!
२३ वर्षांनी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये११ वा वर्ल्डकप सुरू
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये झालेल्या उद्घाटन
सोहळ्यात भारत व पाकचे कर्णधार.
मागील वर्ल्डकप फायनलमध्ये धोनीचा
विजयी षटकार अशा रीतीने दाखवला
{ ख्राइस्टचर्चमध्ये
दुपारी १.३० अाणि
ऑस्ट्रेलियाच्या
मेलबर्नमध्ये
२.३० वाजता सुरू
झाला उद्घाटन
सोहळा. (भारतीय
वेळेनुसार)
{ न्यूझीलंडच्या
उद्घाटन
सोहळ्यात ४ देशांचे
व ऑस्ट्रेलियात
१० देशांचे खेळाडू
उपस्थित.
पपेटने
दाखवली
विजय कथा
या विशाल बाहुल्याद्वारे
सर्व वर्ल्डकपमधील
फायनलच्या विजय
कथा सादर झाल्या. हा
फोटो धोनीच्या विजयी
फटक्याचा आहे.
मेलबर्नमध्ये भारतीय
कलाकारांनी फटा
पोस्टर निकला हीरो'च्या
धतिंग नाच' गाण्यावर
नृत्य केले.
^२०११ मध्ये
ख्राइस्टचर्च रग्बी
वर्ल्डकपची तयारी करत
होता. मात्र, भूकंपाने सर्व
उद््ध्वस्त केले. ४ वर्षांनंतर
क्रिकेट विश्वचषकाने
ख्राइस्टचर्च परतले आहे'
हे सांगण्याची संधी दिली.
- जॉन के,
न्यूझीलंडचे पंतप्रधान.
हाच होता तो षटकार
वानखेडे स्टेडियम :
२ एप्रिल २०११
ट्विटमध्ये मोदी म्हणाले, टीम इंडिया, खेलो दिल से
वर्ल्डकप लाओ फिर से, पीएमनी सर्व १५ खेळाडूंना
स्वतंत्र संदेश पाठवले. जडेजाला सर' संबोधले.